शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४
दोन उमद्या नेतृत्वाची दखल घेतली सह्याद्री वाहिनीने...
पिंपळगाव खडकीला सुजलाम सुफलाम करून प्रगतीच्या दिशेवर मार्गक्रमण करून देणारे जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. मथाजी पोखरकर तसेच पिंपळगावचे ग्रामविकास अधिकारी मा. श्री. रवींद्र खंडारे भाऊसाहेब यांची सह्याद्री वाहिनीवर मुलाखत घेण्यात आली.
शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४
शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
संकल्प नवीन वर्षाचा २०१४ साल कसे घालवायचे?
मी बांगर वनाजी बजरंग
आपल्याला
नम्र विनंती द्वारे आज्ञा देतो कि आपल्या महाराष्ट्रात परवा तारीख ०१/०१/२०१४ वार बुधवार या दिवसापासून नवीन वर्षापासून ,नवीन संकल्प करावयाचा आहे
१.नवीन वर्षात प्रत्येकाने इतरांबरोबर प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.
२.व्यसनांपासून दूर राहा
३.नम्रता ,धैर्य ,संयम ,चिकाटी या गुणांची कास धरा
४.आपल्याला महाराष्ट्रात दारू निर्मिती बंद कायदा
व दारू विक्री बंद कायदा आणावयाचा आहे त्यासाठी
तरुण पिढीने प्रयत्न करावयाचा आहे ,सध्या आपल्या राज्यात व्यसनांचे प्रमाण खूपच वाढले आहे ,कित्येक
लोकांचे प्रपंच धुळीला मिळाले आहेत .दारू पिणाऱ्या
माणसांपासून व दारू विकणाऱ्या दुकानांपासून समाजाचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील आपल्या भगिनींना या गोष्टींचा फार त्रास होत आहे . तरी सर्व देशप्रेमी नागरिकांनी हि गोष्ट ध्यानात घ्या .
५.मी ही गोष्ट आपल्याला का सांगत आहे ?
तर या देशातील प्रत्येक व्यक्ती
हि आपली भाऊ -बहिण आहे. नव्हे नव्हे तर ती
आपल्या कुटुंबातील सदस्य आहे ,या देशात कुणीही परका नाही हि भावना आपल्या मनांत सतत जागृत पाहिजे .आणि जे
खरोखरच परके आहेत त्यांचा सुद्धा बंदोबस्त करावयाचा आहे
६.दिनांक ०१/०१/२०१४ पासुन प्रत्येक व्यक्तीने छ. शिवाजी महाराजांसारखे वागावयाचे आहे कारण आपण या देशाचे मालक आहोत .
७. हे पत्र वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने किमान १०
मित्रांना हे पत्र ई-मेल करून पाठवायचे आहे
धन्यवाद
जय हिंद,जय महाराष्ट्र !
आपला भाऊ
श्री वनाजी बजरंग बांगर (बी.टेक)
मु /पो -पिंपळगाव (खडकी) ता.आंबेगाव जि .पुणे पिन ४१०५०३ मो .९९२२५६३०८५
"लवकरच पिंपळगावच्या बातम्या मी अपडेट करेल",वनाजी बांगर
ता .०१/०१/२०१४
श्री .बांगर वनाजी बजरंग
मु /पो .-पिंपळगाव (खडकी)
ता .-आंबेगाव जि .-पूना
पिन -४१०५०३
प्रिय मित्रांनो
,
सप्रेम नमस्कार
आपल्याला महाराष्ट्रात ५०,०००
तरुण घडवायचे आहेत ,कि जे पुढील काळामध्ये
म्हणजे सन २०१३ नंतर (आजपासून) समाजाला दिशा देण्याचे व मार्ग
दाखविण्याचे कार्य करू शकतात .मुलगा शिकला
अभियंता किंवा डॉक्टर किंवा पदवीधारक झाला
म्हणजे मुलगा घडला असे नाही तर त्याला जीवन म्हणजे काय ? जीवनात
कोणती गोष्ट महत्वाची आहे ?आपली कर्तव्ये काय ?हे माहित नसते .तसेच
१.आदर्श नागरिक कसे बनायचे .
२.जीवनात जी व्यक्ती महात्मा
बनले आहेत त्यांच्या जवळ कोणते विशेष गुण होते .त्यांचे अधिष्ठान काय होते
.त्यांची विचारसरणी कशी आहे .त्यांच्या मनांत सागरा ईतका प्रेमाचा झरा कसा उत्पन्न
होतो या गोष्टी आपणांस समजत नाहीत
३.आता शिकलेली बहुतेक मुले आई -वडिलांकडे लक्ष्य देत नाहीत ,भ्रष्ट्राचार करतात ,मनावर ताबा नसतो ,गैरमार्गाने वागतात हे असे का घडते
४.या सर्व गोष्टीचे मुलांना मार्गदर्शन करायचे आहे
५.महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगा मला छत्रपती
शिवाजी महाराज ,आदरणीय सचिन तेंडूलकर ,सावित्रीबाई
फुले , कर्मवीर भाऊराव
पाटील ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवायचे आहे .हे शिवधनुष्य आता मीच हाती घेतले आहे
आपला बंधू
श्री . वनाजी बांगर
मो .9922563085
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)