मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

गाव झळकले वृत्तपत्रावर सकाळची बातमी

शैश्निक विकासाला चालना ; स्त्री भ्रुण  हत्या विरोधी जागृती

                                  या बातमी बाबत विचारणा केल्यावर सरपंच म्हणाले, "मुळात हे काम माझ्या एकट्याच्या कारकिर्दीतले नाही आहे या कामासाठी पिंपळगाव ग्रामस्थांचे विशेष हातभार लागले आहे. हि कामे वर्षानुवर्षे होत आलेली आहेत फक्त मी सरपंच असताना त्याची सकाळने त्याची दखल घेतली. मुळात कामाचे श्रेय मथाजी पोखरकर जि.प.सदस्य यांना द्यावे लागेल. बरीच विकासकामे ते सरपंच असताना पूर्ण झाली आहेत.  आमच्या गावाला एकजुटीने काम करायची गरज आहे आणि तसे आम्ही करत आहे. कोणत्याही विकासकामामध्ये आडकाठी न घालता सर्व जण एकमताने त्या कार्यात सहभागी होतात हि महत्वाची बाब आहे. ग्रामपंचायत सदस्य सचिन बांगर, बाळासाहेब पोखरकर, रोहिदास बन्सी पोखरकर, आशाभाभी, वसंत राक्षे, ग्रामसेवक रविंद्र भाऊसाहेब,  या सर्वांच्या परिश्रमाचे हे फलित आहे. मी फक्त निमिषमात्र आहे. "
                           सरपंच रोहिदास पोखरकर हे स्वत: मोठे गावळी आहेत, बंधू भोसरीत कपड्याचे उद्योजक आहेत  शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही दरवर्षी वारकर्यांच्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात. कीर्तने, संत संगत या प्रकारच्या कामांचे आयोजन करतात.  
                             शेवटी त्यांनी हेही नमूद केले कि, एक आदर्श सरपंच बनून दाखविण्याच्या हेतूने लवकरच स्त्री भ्रुण हत्ते च्या विरोधाप्रमाणेच व्यसनमुक्ती चळवळ राबविण्याचाही संकल्प करणार आहे.
-(पिंपळगाव वार्ता: वैभव भागवत )

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

रमजान ईद का त्योहार

रमजान माह की इबादतों और रोजे के बाद जलवा अफरोज हुआ ईद-उल फितर का त्योहार खुदा का इनाम है, मुसर्रतों का आगाज है, खुशखबरी की महक है, खुशियों का गुलदस्ता है, मुस्कुराहटों का मौसम है, रौनक का जश्न है। इसलिए ईद का चांद नजर आते ही माहौल में एक गजब का उल्लास छा जाता है।
ईद के दिन सिवइयों या शीर-खुरमे से मुंह मीठा करने के बाद छोटे-बड़े, अपने-पराए, दोस्त-दुश्मन गले मिलते हैं तो चारों तरफ मोहब्बत ही मोहब्बत नजर आती है। एक पवित्र खुशी से दमकते सभी चेहरे इंसानियत का पैगाम माहौल में फैला देते हैं।
अल्लाह से दुआएं मांगते व रमजान के रोजे और इबादत की हिम्मत के लिए खुदा का शुक्र अदा करते हाथ हर तरफ दिखाई पड़ते हैं और यह उत्साह बयान करता है कि लो ईद आ गई।

कुरआन के अनुसार पैगंबरे इस्लाम ने कहा है कि जब अहले ईमान रमजान के पवित्र महीने के एहतेरामों से फारिग हो जाते हैं और रोजों-नमाजों तथा उसके तमाम कामों को पूरा कर लेते हैं, तो अल्लाह एक दिन अपने उक्त इबादत करने वाले बंदों को बख्शीश व इनाम से नवाजता है।
आमच्याही गावात रमजान मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमचे मुसलमान बांधव या दिवशी विविध मसाल्यांनी युक्त अश्या दुधाचे आयोजन करतात. त्याला शिरकुर्मा असे म्हणतात.सोबत गुलगुले हि असतात. अशी हि दावत विलोभनीय असते. हा कार्यक्रम सकाळी ८.०० पासून रात्री ९.०० वाजेपर्यंत चालतो.
इसलिए इस दिन को ईद कहते हैं और इसी बख्शीश व इनाम के दिन को ईद-उल फितर का नाम देते हैं।

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

दहीहंडी

गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! श्रीकृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास कंस राजाच्या कोठडीत झाला. पण श्रीकृष्ण वाढला मात्र गोकुळात. नंद आणि यशोदेच्या प्रेमात आणि गोपिकांच्या सहवासात. गोकुळातच चोरून लोणी खाणे, गोपिकांची छेड काढणे अशा लीला त्याने केल्या. घराच्या छताला टांगलेली दह्याची हंडी श्रीकृष्ण फोडायचा. तीच प्रथा आता दहीहंडीच्या रूपाने पाळली जाते. पण, काळाच्या ओघात हा उत्सव इतका बदलला आहे की, त्या मागची मुळ संकल्पनाच नाहीशी झाली आहे.

''गोविंदा आला रे आला....मटकी संभाल ब्रिजबाला !'' असे म्हणणार्‍या गोविंदाला बाजूला सारत आधुनिक युगात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वावरणार्‍या महिलाही दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिसतात.
                             आमच्या गावातही या दिवशी मोठया उत्सवात दहीहंडी साजरा केला गेला. पिंपळगावच्या नेताजी आळीमध्ये हा उत्सव पार पडला. जय हनुमान मंडळाच्या वतीने ही दहीहंडी आयोजित केली गेली. साऊंडच्या आवाजामध्ये नाचगाण्याच्या जल्लोषात ही दहीहंडी साजरी करण्यात आली त्याची काही क्षणचित्रे....

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१२

नागपंचमी

नागपंचमी सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो.
श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला.
भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
                             ही झाली नागपंचमीची थोडक्यात माहिती आता आमच्या गावात सोमवार दि.२३ ७ २०१२ रोजी झालेली नागपंचमी खालील प्रमाणेः
१. महिला या दिवशी फुगडया, झिम्मा, झोके खेळतात
२. गावातील पुरूष मंडळी श्रीराम मंदीरा पुढील गोटी उचलतात.